mazionjal

सोमवार, १८ मे, २०२६

स्पंदन...Vibration..Aura cleaning

 

स्पंदन...Vibration..Aura cleaning  


काही जागा नकाशावर नसतात
त्या मनाच्या आत दडलेल्या असतात.

 

काही ठिकाणं फक्त पाहिली जात नाहीत
ती आपल्या आत कुठेतरी कायमची जागी होतात.

 

आपण तिथे फक्त जात नाही,
तर नकळत स्वतःलाच भेटून येतो.

 

त्या रस्त्यांना काही जादू असते का…?
की आपल्या आतच काही हरवलेलं असतं,
जे तिथे गेल्यावर शांतपणे सापडतं
हे कधीच कळत नाही.

 

तिथला वारा वेगळा नसतो,
आकाशही नेहमीसारखंच असतं
पण त्या जागेत पाऊल टाकताच
मनावर चढलेली एक अदृश्य धूळ
हलकेच झटकली जाते.

 

मग आपण क्षण क्षण जगू लागतो
जणू वेळ थोडावेळ मंदावली आहे.

आणि त्या सुंदर क्षणांच्या गर्दीतही
मनाच्या एका कोपऱ्यात
एक शांत जाणीव उभी असते

परत जायचं आहे
पुन्हा त्याच घरात,
त्याच कामात,
त्याच आयुष्यात.”

 

पण कदाचित
हाच त्या प्रवासाचा सर्वात गूढ भाग असतो.

कारण परतताना
जागा बदललेली नसते
बदललेलं असतं आपलं स्पंदन.

 

काहीतरी मागे
तिथेच राहिलेलं असतं
आणि काहीतरी नवीन
आपल्या आत जन्माला आलेलं असतं.

 

म्हणूनच काही प्रवास कधीच संपत नाहीत.

आपण घरी परततो
पण मन अजूनही
त्या जागेच्या शांत प्रतिध्वनीत
हळूच रुंजी घालत राहतं

 

प्रवास संपतो
पण त्या जागेची स्पंदनं
मनात बराच काळ फिरत राहतात.”

 

Gauri Ekbote

सोमवार, ५ जानेवारी, २०२६

ओढ अनामिक

 




शब्द हरवले, डोळे बोलत राहिले गं

सांगितलेलं तुझ्यापर्यंत पोहोचविलं. ।।

आर्तता ही मनाची,मनालाच कळाली गं,

ओढ अनामिक एकमेका लागली गं ।।

 

गौरी


शनिवार, ६ डिसेंबर, २०२५

✨ जिवाशिवांची जडलेली समाधी ✨



जिवाशिवाची जडली समाधी,
अंतरीची सारी व्याकूळता निवळली.
पडलेले सारे कल्लोळही थांबले,
ना काळ राहिला, ना दिशा ह्या दाही.

श्वासांची ही हरवली ती लय,
देहाच्या आठवणीही गेल्या विझून.
स्वतःचेही न उरले भान—
शून्यातून उमटला एक तो  सूर — श्रीकृष्ण,  श्रीकृष्ण…

विटला प्रपंच, तुटली उपाधी,
मनाची सारी चंचलता थांबली.
निरभ्र शांततेत उमलला एक लय—
मन जाहले आता हरिमय, हरिमय.

गौरी 

सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

अबोल शब्दांचा कल्लोळ

**माझी ओंजळ….**  

_— अबोल शब्दांचा कल्लोळ_  


दाटून आलेल्या मनात,  

भावनांचा कल्लोळ…  


ओठांनी मात्र निवडला मार्ग तो — अबोल,  

शब्द जणू विसरले ओठांच्या वाटा.  


मनातल्या गोष्टी, मनातच रुतल्या आता,  

नजरेत कधी असतात कथा अंतरीच्या.  


तर कधी आसवे सांगतात — वेदना जिव्हाळ्याच्या.  

कागदावर उतरू पाहतात कितीतरी विराणी,  


पण गोठते लेखणी अन हरवते  

शब्दांची शिदोरी…  


गौरी  

बुधवार, १८ जून, २०२५

वारी निघाली बघा, ओढ जीवाला तेजाची

 

विठ्ठल विठ्ठल, चैतन्याचा जयघोष

टाळ मृदूंगाची साथ, वारकऱ्यांचा जल्लोष  ।।

 

साथ ज्ञानोबा तुकोबाची , आस विठूला पहायची

वारी निघाली बघा,  ओढ जीवाला तेजाची  ।।

 

भाळी चंदन टिळा , मुखी हरिनामाच्या हो माळा

भजन कीर्तनाच्या ओव्या , वारी हा आनंदाचा सोहळा ।।

 

 काय वर्णू वेळापूर महिमा ,भक्तराज धरती  रिंगणा

धूळ उडे ती पावन माती , तेज असे  त्या घोड्याच्या पाठी ॥

अभीर धुळी लोळे भगवाधारी , अलौकिक असे हरे एक वारी

ओढ आवरेना भेटण्या मुरारी , धावतो बघा हर एक माळकरी  ।।

 

एका वर्षाने बघा भेटली ती माय , शब्द गोठले ओठात  मनी  भावनांना पूर ,

डोळा आसवांची दाटी माय लेकराच्या भेटी , पंढरपुरात ह्या मज भेटला श्रीहरी ||

  

Gauri Ekbote


सोमवार, २४ मार्च, २०२५

सानुला हरी

 




सावळ्या हरीची सानुलीशी तनु 

सानुल्याला माझ्या भरजरी पीतांबरू 


अंगरख्यावर त्याच्या मोत्यांची किनार 

सोनसळी मुकुट गळा वैजयंती माळ 


दृष्ट ना लागो माझ्या सावळ्या हरीला 

टिट लावते भाळी अष्टगंध भरूनिया  


नैवेद्याला ठेविली लोणी भरून हि वाटी 

ह्या वाटीला हो नवविध भक्तीच्या कला कुसरी 


स्वीकारावी हि वाटी माझ्या लाडक्या हरीराया 

गोडी लागो तुझ्या नामाची भवसागर तरावया

सोमवार, ३० डिसेंबर, २०२४

स्वातंत्र्याचा यज्ञ

 




समिधाभिः स्वाहा कृतं स्वातन्त्र्ययज्ञकुण्डम्।
तेषां वीराणां पादयोः प्रणिपातोऽस्माकम्॥

 

धगधगत्या रणांगणात उभे होते ते निर्धाराने

स्वतःला विसरून झगडले प्राणपणाने  !!

 

सर्वसुखानि त्यक्त्वा, विस्मृतं स्वगृहम्।
प्राणेभ्यः प्रियं भारतमातरं सम्मानितम्॥


प्राणाहुतीने ठेविले धगधगते यज्ञकुंडम्

स्वप्न पहिले त्यांनी स्वतंत्रभूमातेचे अखंडम् !!

 

संघर्षेभ्यः तेषां लब्धं स्वतंत्रं प्रकाशम्।
तेजसा विभाति भारतस्य महत्त्वपूर्णं इतिहासः॥