mazionjal

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०१७

अंतरग्रहीय प्रेम

अंतरग्रहीय प्रेम



आई : काय ? ... पृथ्वी वरील मुलगा ? तू केव्हा गेलीस पृथ्वी वर ? तो कुठे भेटला तुला ? हे कस शक्य आहे ? नाही नाही माझा तर विश्वासच नाही माझ्या कानांवर ..... पृथ्वीवरचा ........ शी ..... 
अग आम्हाला तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस ...... आपल्या ग्रहावर काय कमी स्मार्ट लोक आहेत ?
अहो ..... काय करायचं हो ...... 
मुलगी : अग आई तू का एवढी पॅनिक होते आहे ,,,,,, खूप छान आहे तो ,,,,, त्याचा स्वभाव पण ....
आई : स्वभाव ..... अग हि पृथ्वी वरची मनुष्य जात .... काय सांगू तुला .... ह्यांच्या ्रहावर भौगोलिक ग्रॅव्हिटी जास्त आणि माणसांची मानसिक ग्रॅव्हिटी कमी पोरी ..... कुठल्या तरी आभासी दुनियेत असतात हि ..... नको ... नको असं .... सोड त्याचा नाद ... एकतर आभासी जग नाही तर मानसिक दुनिया ..... ह्यापलीकडे ह्याच जग नाही पोरी ... हि मानव जात शापित आहे ..... इच्छा , अपेक्षा ह्यातून ते बाहेर नाही निघत ..... आपल्या सारखं त्यांना मोकळं जगता नाही येत ... ते कायम अतृप्त असतात ..... आणि त्यांचं आयुष्य पण कमी जेमतेम ७० वर्ष .... अंग आपण कमीत कमी १००० वर्ष जगतो .... ऐन उभारणीच्या कष्टाच्या दिवसात तो हे जग सोडेल ....... पोरी ....
मुलगी : अग पण ...... 
आई : अग नाही आणि काही नाही , उद्या पासून तुझं प्लॅनेट बाहेर जण बंद


गुरुवार, २९ जून, २०१७

श्रीरंगा

रंगात रंग होऊनि
रंगले श्रीरंगा सवे
माझी मी न राहिले
भान हरपले श्रीशाया सवे

राधा बावरी म्हणती सगळे
वेडे मन हे तुझ्यात गुंतले
प्रीत न जाणो अजून काय हे
वेड लागले तुझ्या सवे

वेणूवर धरिता तू अधर
सूर मधुर करीती अधीर
ओढ अकल्पित होइ अनावर
ओढे मजला तुझ्याकडे

..... गौरी 

बुधवार, २८ जून, २०१७

Romantic पाऊस




जरा मी जरा तू 
आणि जरासा हा पाऊस Romantic


गडगडणार आभाळ दाटून आलेले ढग
त्यात वीज हि झाली आहे enthusiastic


थंड ओली हवा, चिंब भिजलेले आपण दोघे
वातावरण हि आहे fantastic


वाफाळलेला चहा आणि भाजलेला भुट्टा
मस्त जुळून आलाय सगळं automatic

... गौरी

शुक्रवार, २३ जून, २०१७

सखी


खरंच मुलींचं विश्वच वेगळं असत ,, लग्न अगोदरच आणि लग्न नंतरच असं दोन प्रकारचं आयुष्य त्या एका जन्मात जगतात दोन्ही मध्ये खूप जाणवणारा फरक असतो .. लाडात वाढलेली ,, तळहातावरच्या फोडा प्रमाणे जपलेली पोर लग्न होऊन शोषिक कशी होते, समजूतदार कधी होते हे तीच तिलाच कळत नाही  . अजूनही लग्ना नंतरच एका मुलीचं आयुष्य हे नवऱ्यावर , त्याच्या स्वभावावर , त्याच्या समजूतदारपणावर, त्याच्या विचारांवर , त्याच्या दृष्टीकोनावर , आणि त्याच्या भावनांवर ,  त्या हाताळण्यावर अवलंबून असत.

सखी शाळेत असताना पासून मी तिला ओळखते   खूप छान लिहायची ती , सुंदर कविता करायची
तिचे लेख सुद्धा असायचे पेपर ला , कस सुचत ग तुला, विचारल्यावर नुसतं हसायची
छोट्या गोष्टी पण लिहायची ती त्या वेळेस
काल भेटली मला तेव्हा खूप वेगळंच जाणवलं , खूप बदल झाला होता तिच्यात , तीच राहणं, वागणं बोलणं एकदमच बदललं होत . एखाद्या रुक्ष वाळवंटा सारखी वाटली , कुठलाही ओलावा नाही कि कुठली हिरवळ नाही . बोलण्याचा प्रयन्त केला तर खूप मोजकी उत्तर ... आणि निघून गेली

काय झालं असेल ह्याचा विचार करत मी पण घरी गेले .... नंतर खूप दिवसानी आमची दुसरी मैत्रीण भेटली गप्पांच्या ओघात तिचा विषय निघाला .. तेव्हा कळलं ... वयाच्या २२व्या वर्षी तीच लग्न झाल,  खरंतर तिला नव्हतं च करायचं ,,,, पण आई वडील चांगलंच करतील ...  समाजाला घाबरून तिने ते केलं , आणि एका अग्नी कुंडात उडी घेतली  .....तिच्यातलं ते हिरवं रान वाळवंट व्हायला इथूनच  सुरुवात झाली .  तिच्या त्या पारिजातकाच्या फुला  सारख्या नाजूक मनाला एका उष्ण ओंजळीत दिल गेलं होत ,त्या ओंजळीला पहिला पाऊस कधी कळलाच  नाही ,,, ना कधी त्या फुलाच्या नाजूकतेची जाणीव झाली , भावनांची नाजूक किनार त्या ओंजळीत कधी तिने अनुभवलीच नाही ,,, साथ, सोबत, विश्वास , नाजूक हवा हवासा वाटणारा स्पर्श  त्या ओंजळीने  तिला कधी दिलाच नाही.     ज्यामुळे ते सुकलं , कोमेजले . लग्ना झाल्यावर मुलींच्या काही अपेक्षा असतात ... आणि ते नैसर्गिक असत ,,,, प्रत्येकीला त्या दिवसात वाटत ,,, नवऱ्या बरोबर राहावं, फिरावं ,,, पण हिच्या बाबतीत सगळं उलटच होत गेलं ... ज्या अपेक्षा ती करायची त्याच्या उलट नवऱ्याचं वागणं होत .... सुरुवातीला मन मारून .... जाऊ दे .... म्हणून सोडलं त्यानंतर मुलां साठी त्याच वागणं  accept केलं .... पण तिच्या मनावर घाव होतच होते . त्यातून रक्त कधी आलंच नाही ...फक्त ते सुजून हिरवं निळं झाल... सततच्या घावांमुळं ते नाजूक मन संवेदना हरवून बसलं  ,,,,,लेखणी ने तर कधीच अडगळ पकडली होती ,  फक्त सोसणं एवढंच सुरु होत , आतातर तीच मन इतकं कडक झालं होत कि होणारे घाव पण त्याला जाणवत नव्हते .

गुरुवार, १ जून, २०१७

प्रेम म्हणजे…………… प्रेम म्हणजे………. प्रेम असत

सतत तुझा विचार कारण प्रेम असत
 मला बघून तीच लाजणं
प्रेम नाहीतर काय असत

नदीच अवखळपणे समुद्राकडे वहाण म्हणेज प्रेम असत
आणि समुद्राचं लाटांच्या भुजा पसरवून तिला आपल्यात सामावून घेणं म्हणजे प्रेम असत.

एका छत्रीत दोघे असणं म्हणजे प्रेम असत
अर्ध तीच भिजणं , अर्ध माझं भिजणं म्हणजे प्रेम असत

कठीण क्षणी साथ देणं म्हणजे प्रेम असत
दूर जाताना मागे वळून बघणं प्रेम असत

आठवणी आठवत गालात हसणं प्रेम असत
तू नसताना तुझा भास होणं प्रेम असत

तुझ्या आठवात गुंतत जाण  प्रेम असत
रंगात तुझ्या रंगून जाण प्रेम असत
कारण प्रेम म्हणजे…………… प्रेम म्हणजे………. प्रेम असत

सोमवार, २२ मे, २०१७

तुझ्यात जीव गुंतला

कधी भांडण 
कधी रुसवा फुगवा 
तुझ्यात जीव गुंतला 

कधी कठीण असे क्षण 
कधी त्रासलेल मन 
तुझ्यात जीव गुंतला 

कधी तूझ खरं 
तर कधी माझं खरं 
तुझ्यात जीव गुंतला 

कधी तुझं ताणून धरण 
कधी माझं सोडून देणं 
कारण तुझ्यात जीव गुंतला 
..... गौरी⁠⁠⁠⁠