mazionjal

गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८

घुसमट


परी घरातली सगळ्या लहान ,,, दोन भावांच्या पाठीवर झालेली .. मुलीची हौस होतीच बापटांना ... परी झाल्यावर तर  आकाश ठेंगण होत त्याना . त्या छोट्याश्या परीला जेव्हा त्यांनी हातात घेतलं .... डोळे पाण्याने भरून आले होते .... देवाने जगातलं खूप मोठ्ठ सुख पदरात टाकलं ... परीला परी सारखंच ठेवेन ... हे तेव्हा पासूनच त्यांनी मनात पक्क ठरवलं ... गोरी गोरी ,,, गोबऱ्या गालाची , निळ्या डोळ्याची, आणि हसली कि तिच्या उजव्या गालावर सुंदर खळी अशी होती परी बापट . हो ... तीच नाव त्यांनी परीच ठेवलं ...
शाळेत जाताना दोघे भाऊ तिला तीच शाळेचं दप्तर सुद्धा उचलू देत नसत तिघेही शाळेत बरोबर जात , परीला अगदी वर्गात सोडून हि दोघे त्यांच्या वर्गात जात . शाळा सुटल्यावर पण तिला घेऊन मगच निघत .... खूप जीव होता सगळ्यांचा परी मध्ये .. आई बाबां साठी तर ते शेंडेफळ होत ... ती जे म्हणेल ते तिला ते देत
परी जशी जशी मोठी होऊ लागली तस तशी ती अजूनच सुंदर दिसायला लागली तिचे निळे डोळे , गालावरची खळी मोहून टाकायची समोरच्याला , तिच्या भावाना  आणि वडिलांना तर तिचा खूप अभिमान होता ... पण आई ला खूप काळजी वाटे ... पोर दिसायला चांगली .... लोक नाहीत ना पण तशी .... त्या रोज तिची दुष्ट कधी  , त्यावर तिचे दोन्ही भाऊ आई ला समजावत ... आम्ही आहोत ना नको काळजी करू . परीला. रूपाचा गर्व नव्हता
एकदिवस तिचे वडील ऑफिस मधून घरी आले , चहा वैगरे घेतला आणि अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागलं , तिचा मोठा भाऊ घरी होता , त्यांनी त्याला जोरात आवाज दिला , आणि खाली कोसळले , ऍम्ब्युलन्स बोलावून दवाखान्यात नेई  पर्यंत खूप उशीर झाला होता , पहिलाच attach  इतका जोरात होता कि त्यात ते गेले . घरातला मोठा आधार गेला , ह्यातून सावरायला सगळ्या घराला दोन वर्ष लागली
मोठ्या भावाला जॉब होता त्यावरच आता घराची जावबदारी होती , छोटा भाऊ लास्ट इयर ला होता ,,, आणि परी फर्स्ट इयर .  
कॉलेज संपलं आणि एक  स्थळ तिच्या साठी  नात्यातल्या नि सुचवलं .. चौकशी केली आणि मुलगा चांगला आहे कळलं, पाच वर्षांपूर्वी च त्याचे वडील वारले होते आणि तेव्हा पासूनच तो घर सांभाळत होता घरात आई आणि तो .. मोठ्या बहिणीचं लग्न झालं होत  ... स्थळ थोडं लांबच होत पण मुलगा चांगला होता.
लग्न ठरलं ... खूप धुमधडाक्यात परी शरद बरोबर लग्न झालं ... शरद एका private कंपनी मध्ये कामाला होता . पगार हि चांगला होता त्याला , परी त्याला पाहतच आवडली होती . शरद एक चांगला मुलगा होता पण  वाईट संगती मुळे  दारूचं अतिशय व्यसन लागलं  होत ,,, हे लग्ना नंतर थोड्याच दिवसात परीला कळाल , पण चौकशी केली तेव्हा कोणी का नाही सांगितलं ? हे कायम परी च्या मनात येई ,, शरद रोज पिऊनच घरी येत , घरी त्याची आई आणि त्यांच्या शेजारीच त्याची मोठी बहीण राहत
शरद सगळा  पगार आई ला देत आणि शरद चा पगार मिळाल्या मिळाल्या आई पहिले त्यांच्या बहिणीच्या घरी सगळं सामान भरून,  बिल भरी मग उरलेल्या पैस्यात  घराचं, तस बघितलं तर तिच्या नणंदेची  परिस्थिती चांगली होती त्यांचे मिस्टर एका चांगल्या कंपनी मध्ये जॉब ला होते , पण कायम बाहेर फिरस्ती . त्यामुळे परीची नणंद कायम परी  कडेच असे  , आता हि आलीय मग आपल्याला आता ह्या घरात येणंजाण कमी होईल , पैसे पण नाही मिळणार शिवाय परी हि दिसायला छान ,, त्यांच्या पेक्षा तर क्तितीतरी पटीने छान होति ह्या विचारामुळे आणि द्वेषा मुळे तिच्या नणंदेने सासूच्या मनात परी विषयी वाईट मन करायला सुरवात केली
तस त्यांच्या मनात सुद्धा परीमुळे आता शरद आपल्याला पैसे देईल कि नाही हि एक गोष्ट होतीच आणि तिच्या नणंदेने त्याला अजून खतपाणी घालायला सुरुवात केली होती , त्या दोघी सतत परीला कायम टोमणे मारणे , काम काढून स्वतः निघून जात , तिला त्या शेजारी सुद्धा कोणाशी बोलू देत नसत  , परी हि गोष्ट घरी सांगू शकत नव्हती , आई ला वाईट वाटेल , दोघे भाऊ भांडायला येतील ... उगा वाद कशाला ह्या मुळे परी माहेरी जात  नव्हती
भावना ह्या स्त्री पुरुष फरक करत नाहीत त्या जश्या एका स्त्री ला असतात तश्या त्या एका पुरुषाला सुद्धा असतात . परी ला शरद चा सहवास आवडत होता, तो आपल्या बरोबर असावा त्याने आपलं कौतुक करावं , जवळ घ्यावं असं तिला नेहमी वाटे , एक नवरा म्हणून तो हि  खूप चांगलं होता , जरी पिऊन घरी येत होता तरी तो परी ला कधी त्रास देत नसे  त्याला परी खूप आवडत होती, हे जस शरद च्या आई ला आणि बहिणीला कळलं तस त्या रोज काही हि कारणावरून परिशी भांडू लागल्या . शरद तर नेहमी नशेतच घरी येत असे त्यामुळे परी तिची बाजू कोणा पुढे मांडणार .. माहेरी सांगता येत नव्हतं कि शरद जवळ मन मोकळं करता येत नव्हतं . तिच्या सासू आणि नणंदेचा राग इतका पराकोटीला गेला कि त्या आता शरद आणि परी मध्ये भांडण लावू लागल्या , इतकंच काय कि त्या दोघांना कसलाच एकांत मिळू देत नव्हत्या , जर ह्यांना चुकून एखाद मुलं झालच तर परत पैस्यात वाटा होईल ह्या हेतूने तिची नणंद कायम तिचा मुलगा शरद आणि परी च्या मध्ये पाठवत , रात्री सुद्धा त्याला शरद आणि परी जवळ झोपवी  लग्ना नंतर सुख तिच्या पासून पळूनच गेलं,  ना कुठले सणवार ना कुठली हौस ..  शरद आणि परी मध्ये सुखाचे असे फक्त एकच क्षण होता  ,लग्नाच्या रात्रीचा त्या नंतर ती दोघे कधीच एकत्र आली नाही ... किंवा येऊ दिली नाहीत  . लग्नाचं पाहिलं वर्ष संपत ना संपत तोच एक दिवस शरद घरी  खाली कोसळून बेशुद्ध झाला , दवाखान्यात ऍडमिट केल्यावर कळलं कि त्याच्या  लिव्हर ने आता काम कारण बंद केलाय आणि आता जर त्याने पिणं सोडलं नाही तर डॉक्टर सुद्धा काही करू शकणार नाही .
हे ऐकून सुद्धा शरद च्या आई आणि बहिणीचं मन कळवळल नाही त्या दिवशी सुद्धा त्या परिशी खूप भांडल्या ,शरद ला दवाखान्यातून घरी आणलं , पण त्याची सवय  काही सुटली नाही घरी ठेवलेली बाटली घेऊन तो परत सुरु झाला ... आणि व्हायचं तेच झाल
एका वर्षात शरद गेला . परी वर तर आभाळच कोसळलं ... हा कधी तरी सुधरेल ,, आपलं सगळं नीट होईल ह्या आशेवर ती सगळं सहन करत होती , शक्य होईल तितकं शरद ला दारू पासून लांब ठेवण्या चा प्रयत्न करी पण ... जे नको तेच झालं,
 हिच्या मुळेच माझा मुलगा गेला ... पांढऱ्या पायाची अवदसा म्हणून त्याच्या आई ने परीलाच दोषी केलं
शरद गेल्याच कळताच परी चे भाऊ आणि आई तिच्या घरी आले तेव्हा सुद्धा तिच्या सासूने आणि नणंदेने  त्यांच्याशी खूप भांडण केल , ह्या दोघी असं का बोलता हे त्यांना काळेच ना ... परी ने त्यांना कधीच काही सांगितलं नव्हतं .
दहाव्या दिवशी हिला इथून घेऊन जा तुमच्या बरोबर मी नाही सांभाळणार हिला असं तिच्या सासूने तिच्या भावा ना सांगितलं
.. ह्या असं का बोलतात हे त्या दिवशी परी ने सगळं अगदी पहिल्या दिवसा पासूनच सांगितलं, शेजाऱ्यांनी तिच्या भावांना सांगतील कि जेव्हा तुम्ही लग्न ठरवायच्या वेळेला चौकशी करायला आलात तेव्हा आदल्या दिवशी  शरद च्या आई ने आणि बहिणीने सगळ्यांना भांडून धमकावलं होत कि शरद बद्दल सगळं चांगलाच सांगायचं  . ऐकल्यावर सगळ्यांना खूप वाईट वाटलं आणि राग पण आला . तू आम्हाला का नाही सांगितलं ... पण आता बोलून काही उपयोग नव्हता .
परि च्या भावानी तिच्या सासूला ठणकावून सांगितलं आमची बहीण काही आम्हाला ओझं नाही ... सगळं आयुष्य आम्ही तिला सांभाळू पण ह्या पुढे तुमचा आमचा संबंध संपला कुठल्या हि प्रकारे केव्हा हि परी ला कॉन्टॅक्ट करायचा नाही
आणि ते परी ला घेऊन घरी आले.
दोन वर्ष परी भांबावलेल्या अवस्थेत होती , ना कोणाशी बोलत ना  धड खात पित ... आपण परीच नुकसान केलं हि भावना तिच्या भावां वाटे .
आता तीच परत लग्न नाही करायचं आपण तिला सांभाळू परत तिला कुठलाच त्रास होऊ द्यायचा नाही हे त्यांनी ठरवलं . तिला थोडं मोकळं वाटेल , थोडं बाहेर पडली तर विचार बदलतील मोकळी होईल,  म्हणून घराजवळच एका कंपनी मध्ये ती जॉब करू लागली . भावांची लग्न झाली , त्यांना मुलं झाली, त्या मुलां मध्ये  परी रमली पण ती शरद ला विसरू नाही शकली
तो एका दिवसाचा  त्याचा सहवास ती कायम मनात साठवून होती तिने कितीही ती आठवण दडपण्याचा प्रयत्न केला तरी तिला त्यात हवं तस यश येत नसे ,  भावना दाबून ठेवणं तिच्या साठी कठीण होत , सणावाराला , लग्न कार्यात तिच्या भावजाया , मैत्रिणी नटून थटून मुलां सोबत मिरवत , तेव्हा परी ला हि उणीव जास्त जाणवत . रमणीचे जीवन म्हणजेच  रती आणि वत्सलता ! ह्या दोन्ही जीवन प्रवृती तिच्या   जीवनातून वजा झाल्या होत्या
मनातल्या मनात ती कुढत होती .

Gauri Ekbote


सोमवार, २५ जून, २०१८

मन

आतुरलेले मन
आणि आसुसलेली धरा....

भेटीची आर्तता 
अन अंतराचा दुरावा

मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

तत्व : एक वास्तविक स्थिति


स्त्री तत्त्व आणि पुरुष तत्त्व .... ह्याला gender दृष्ट्या न बघता थोडा  विचार केला तर जाणवलं कि हे तत्त्व प्रत्येकात असत . पुरुष हे हळवे , काळजी घेणारे आणि कणखर असतात , तसेच एक स्त्री सुद्धा कणखर ,परिस्थितीशी खंबीर तेने लढा देणारी आणि तेवढीच हळवी असते. मुळात हि तत्त्व आहेत ती सगळी कडे असतात अगदी पशु पक्षी झाड वेलीत सुद्धा , प्रत्येकात हे  असतंच आणि म्हणूनच ती व्यक्ती माणूस म्हणून जगत असते , नुसतं एक तत्त्व घेऊन आपण जगू शकतो पण त्याला खऱ्या अर्थाने जगणं नाही म्हणू शकत त्याला जेव्हा दुसऱ्या तत्त्वचि साथ मिळते तेव्हा तो पुरुष होतो , म्हणजे माणूस होतो .
मुळात जर अगदीच स्पेसिफाई करायचं तर आपला मेंदू हा विचार करतो , तुलनात्मक अभ्यास करतो निर्णय घेतो हे पुरुष तत्त्व आणि आपलं मन हे भावनिकता दर्शवत ते प्रेम , आपुलकी , राग व्देष , अश्या सगळ्या भावना त्याला समजतात , परिस्थिती च गांभीर्य हे जस मनाला जाणवत तर ह्या परिस्थिती तुन मार्ग कसा काढायचा हा विचार मेंदू करतो .
पण आपण ह्या गोष्टी कडे तेवढ्या विस्तारात्मक दृष्टीने न पाहता त्याला संकुचित बनवतो आणि तेच बरोबर हे धरून चालतो . आणि ह्या विचारातूनच पुरुषप्रधान जग स्त्री प्रधान जग , नारी शक्ती  निर्माण होत आणि वाद वाढत जातात . माणसाला माणूस म्हणून बघितलं तर ह्या सगळ्याची काहीच गरज नाही. जसे एका स्त्री ला जगताना काही अडचणी येतात काही परिस्थिती ला समोर जावं लागत तसेच एका पुरुषाला सुद्धा कठीण परिस्थितीच्या विळख्या ला सोडवावे च लागते . स्त्री आणि पुरुष ,,,,,, ह्यात बऱ्याचदा स्त्रीला झुकत माप असत ह्याची बरीच कारण पण आहे .ह्या झुकत्या मापामुळे कधीकधी एखादा चांगला , हुशार , हळवा पुरुष दाबला जाऊ शकतो , त्याच पूर्ण आयुष्यच बदलू शकत , त्याच्या साठी होत्याच नव्हतं सुद्धा होऊ शकत ह्याचा कुणी विचार करू शकत का ? ... कोणत्या तरी मूवी मध्ये ऐकलेलं एक संभाषण आठवत कि दर वेळेला स्त्री च बरोबर असते असं नाही , दोन्ही बाजू चेक केल्या पाहिजे . एखादा पुरुष जर स्त्री ला मारत असेल तर आपण म्हणतो कि निर्दयी आहे , आणि एखादी स्त्री जर पुरुषाला मारत असेल तर म्हणतो कि नक्की ह्यानेच काहीतरी केलं असेल . हे वैश्विक आहे सगळे ह्याच प्रकारे विचार करतात आणि आपली मत बनवतात , पण असं नसत पुरुष सुद्धा बरोबर असू शकतो ,
असच काहीस घडलं माझा एक मित्र अभि बरोबर , आमच्या ग्रुप मधला अभि म्हणजे एकदम happy-go-lucky ,बोलण्या बाबत खुप बिनधास्त , कुठलाच विचार करायचा नाही , जे समोर येईल तस स्वीकारायचं अश्या स्वभावाचा , कुठलीही भीड़ भाड़ नाही, तेव्हढाच तो मनाने साधा , सरळ  अणि निर्मळ , आई वडिलांचा एकुलता एक त्यामुळे लडात वाढलेला पण लाड डोईजड नव्हते , तेव्हढाच समंजस पण होता. कॉलेज च शेवटच वर्ष आम्ही खूप मस्त एन्जॉय केल , आम्हाला सगळ्यांना campus interview मधून छान नौकरी पण लागली।  , अभी सुद्धा एका लिमिटेड कंपनी  ध्ये  Purchase Assistant म्हणून join झाला। सुरुवातीला छान चार आकडी पगार होता , त्याचे बाबा खूप खुश होते कि मुलगा कमावता झाला , वर्ष खुप मस्त गेल सुट्टी च्या दिवशी आम्ही सगळे जमायचो कॉलेज ग्राउंड वर , मस्त धमाल यायची। मज्जा असायची . त्या दिवशी असच जमलो असताना अभिला फोन आला , आई ला अचानक छातीति दुखायला लागल म्हणून लगेच दवाखान्यात नेल , तो माइल्ड अटॅक होता।  योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट मिळाल्या मुळे , धोका टळला. बइपास सर्जरी  झाल्यावर त्या घरी आल्या ,
आता त्यानी एकच गोष्ट धरून ठेवली ती म्हणजे अभी च लग्न , सुरुवातीला अभी नव्हता तयार, काकुंच्या तब्बेति कड़े बघून तो तयार झाला.   तो तयार आहे हे बघून लगेच घाइत काकुनी मुलगी बघितली अणि लग्न लावल  , त्यांचा उद्देश्य एकच होता की माझ आता काही खर नाहीं , आहे तोपर्यंत अभिच लग्न अणि मुल बघितली कि मग जे होईल ते होवो.
मुलगी मुंबई ची दिसायला अतिशय सुन्दर , अभी पेक्षा जास्त शिकलेली होती , अभिला तर दीपिका पहिल्या क्षणीच आवडली , एरवी कुठल्याही मुली कडे न बघणारा अभी दीपिका कडे पाहतच होता , आम्हाला वाटल की ती नाही म्हणेल पण तिच्याकडून पण होकार आला , अणि मस्त धूम धडाक्यात लग्न झाल.
अभी अणि दीपिका सुरुवातीच पहिल वर्ष सणवार करत संपल. ह्या वर्षात अभी ला कायम जाणवत होत कि दीपिका आपल्यात असून नसल्या सारखीच , तो कितीदा तरी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न पण करत होता पण ती विषय टाळायची , तिने ह्या एका वर्षात एकदाही अभिला तिच्या जवळ नाही येऊ दिल , अभिला थोड ते विचित्र वाटल पण कदचीत सगळ नवीन असल्यामुळे आणि arrange marrange असल्यामुळे ती अशी लाजल्या सारखी असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केल , तिने सगळ्यात मिसळाव अस अभिला कायम वाटे पण दीपिका कायम अलिप्त राहत होती .
ऑफिस मधे अभी च्या responsibility वाढ झाली होती तो आता सीनियर परचेस मैनेजर झाला होता।  दीपिका मात्र कुठे तरी नाराज होती तिला अभिच बिनधास्त, मनमोकळ  वागण नव्हत आवडत ,   दीपिकाला, ती जस म्हणेल तस वागणारा ,तीच ऐकणारा नवरा हवा होता अभिला दीपिका आवडत होती , आणि  आई बाबां वर पण त्याच तेवढच प्रेम होत।  दीपिकाला त्याच अणि त्याच्या आई च एकमेकांशी बोलसुद्धा पसंद नव्हत , तिच्या मता प्रमाणे  आई ने पाहिले तिला सांगयच, मग ती अभी ला सांगेल , जमेल तस - जमेल तेव्हा , आठवेल तेव्हा , ह्या पद्धतीने जर नाहीं झाल अणि आई जर डायरेक्ट अभीशी बोलली तर मात्र दीपिकाचा  जाम संताप होत असे,  अभी  आईचच ऐकतो , असा ती कंगवा करि , शेजारीपाजारी जावून सगळ्यांना उलट सुलट सांगे , पण सगळ्यांना आई चा स्वभाव माहित होता .... आई अभी सारखीच मनमिळाऊ आणि शांत होती , त्यामुळे कुणी तीच बोलन मनावर नव्हत घेत ,
दीपिका मुंबई university मधून MBA  केलेल , पण नौकरी करायची तिची अजिबात इच्छा नव्हती ,  ती घर कामात ही मदत नव्हती करत, आई काम करून दमुन जात असे , दीपिकाला टीवी वरच्या वेग वेगळ्या सेरिअल्स अणि मूवी बघण्याआवड होती , अणि संध्याकाळी शॉपिंग। शनिवार रविवार outing अस दीपिका चा क्रम असे आणि ह्यात काही कमी पडल किंवा जर एखादे वेळी अभी नाही बोलला तर भांडण , एके दिवशी असच month end आणि दीपिकाला गोवा जायचं होत ती अभी कडे पैसे मागत होती आणि तू हि चल म्हणून मागे लागलेली , आई ची तब्बेत जरा आज खराब वाटत होती म्हणून अभी सुटी काढून घरीच होता , आदल्या रात्री पासून दीपिका त्याच्या मागे लागली होती चलच म्हणून , अभी ची अजिबात कुठे जायची इच्छा नव्हती , कस तरी त्याने तिला पैसे दिले ते घेऊन घरातील परिस्थिती न बघता दीपिका गोवा तिच्या मित्र मैत्रिणीन बरोबर निघून गेली , आई ला खूप वाईट वाटत होत , तीला अभी ची आता काळजी वाटायला लागली होती , लग्नाला दोन अडीच वर्ष झाली आणि पाळणा हलायची कुठलीच चिन्ह दिसत नव्हती उलट वाद आणि भांडण वाढतच होत , शेवटी त्या दिवशी आई ने ह्यावर एक उपाय म्हणून अभी ला दुसर घर घेऊन रहा म्हणून सुचवलं कदाचित त्यामुळे ती बदलेल .... अभी ला ते मान्य नव्हत, पण बाबा हि ह्या गोष्टीला सहमत होते म्हणून त्याच area मध्ये ३-४ बिल्डींग सोडून एक flat अभिने विकत घेतला ह्यात दीपिका च्या आई वडिलांनी सुद्धा काही पैस्याचा  share दिला आणि दीपिका अभी तिथे राहू लागले , सुरुवातीला दीपिका खुश होती पण आठ दिवसातच ती परत पहिल्या सारखी झाली आता तर ती खूपच बिनधास्त झाली घरात खायला हि काही करायची नाही कि अभी कडे लक्ष द्यायची नाही , संध्याकाळी अभी दीपिकाला लपून आई बाबांकडून जेऊन घरी जात होता. असेच २-३ महिने गेले , वैवाहिक सुख अस अभी ला माहितच नव्हत , त्याच्या बरोबर लग्न झालेल्या आमच्या एका मित्राला एक मुलगा आणि एक मुलगी होती , त्यांना बघिल्यावर अभिला मनातून खूप वाटे आपल पण मुल असत तर आज ते एवढ असत , मनातून तो खूप कुढत होता . दीपिका मात्र तिच्या life मध्ये गुंग होती तिला अभी कळतच नव्हता ,
एके दिवशी संध्याकाळी बाहेर भटकून येताना दीपिकाने अभी ला  आई कडून निघताना पाहिलं , तू तिथे का गेला होता ,म्हणून विचारू लागली अभी ने काही उत्तर च दिल नाही मग दीपिकाला अजूनच जोर वाढला , ती रात्रभर अभी शी भांडत होती , आज जे तिला हव होत ते ती बोलून गेली ते म्हणजे divorse , दिपिकला अभी बरोबर आता नव्हत राहायचं तिला divors हवा होता , तिला अजून मोकळीक हवी होती , गळ्यातल् मंगळसूत्र तिला आता एक लोढण , वाटू लागल होत , तिला एक मोकळ , कुठलीही आडकाठी नसलेलं , कुठलीही जवाबदारी नसलेले , कुणी विचारणार नाही अस life हव होत , अभी , अभीच घर त्याच नाव तिच्या नावापुढे जोडन त्याच आडनाव हि तिला आता जड जात होत , तिला तिच्या आई बाबा बरोबर देखील नव्हत राहायचं , तिच्या आई ने तिला खुपदा समजून सांगितल पण दीपिका आता कुणाचही ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हती , तिला तीच आयुष्य तिच्या पद्धतीने जगायचं होत आणि त्या साठी तिला divorse हवा होता .
सगळ्यांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण दीपिका समजाऊन घेण्याच्या मनःस्थिती तच नव्हती तिला तीच च खर करायचं होत , अभी पण आता कंटाळा होता शेवटी त्यानेच निर्णय घेतला आणि दीपिकाला divorse देऊन मोकळ केल . खर बघता जेव्हा त्याने दीपिकाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला होता पण ते एकतर्फी च राहील , त्याच हळुवार प्रेम दीपिकाला कळलच नाही .
ज्या दिवशी divorse वर सह्या झाल्या त्या दिवशी दीपिकाने पुण्यातला तो flat जो अभी ने वेगळा घेतला होता तो स्वतच्या नावावर करून घेतला , लग्नात तिच्या आई बाबांनी घातलेले आणि अभी च्या आई ने दिलेले सर्व दागिने तिने तिच्या काडे घेतले ,लग्नात मिळालेले सगळ तिने अभी कडून मागून घेतल .
आता अभी आई बाबां बरोबर राहत होता सुरुवातीचे ३-४ महिने त्याला सावरण्यात च गेले . त्याने खूप मनापासून दीपिकावर प्रेम केल होत आणि ती सगळ विसरून तो flat विकून निघून गेली होती .
आई ला वाईट वाटत होत कि आपण खूप घाई केली अभिच्या लग्नाची , पोराच नुकसान झाल ... ह्याच मनःस्थिती त्या होत्या . पण २ वर्ष नंतर ते सावरले . .
आता अभी व्यवस्थित जॉब ला जातो , आमच्यात येतो मनसोक्त गप्पा मारतो. पण लग्न ह्या गोष्टी वरून त्याचा कायमचा विश्वास उडालाय .

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०१८

संघर्ष



संघर्ष
काही स्त्रीयांच्या बाबतीत आयुष्य म्हणजे एक तप च असत , संघर्षमय जीवन काय ते ह्या मुलीन कडे पाहून कळत ... हो मुली च , जरी त्या वयाने मोठ्या झाल्या तरी,  कारण एका तरुण रक्तासारख्या त्या कायम जोमाने ,खंबीरतेने , न डगमगता आलेल्या परिस्थितीला, आव्हाहनाला समोरया जातात , आणि कितीहि संकट आली तरी त्यातून मार्ग काढून बाहेर पडतात , सोशिकता , संयम , खंबीरता , दृढ विश्वास स्वतःवर आणि त्या विधात्यावर ,  हे देऊनच देव सर्वाना पृथ्वीवर पाठवतो , म्हणूनच  त्या ह्या परिस्थिती ला हसत मुखाने हाताळतात . आणि प्रत्येक स्त्री मध्ये हे सगळे गुणविशेष असतातच .
सरिता , नावा प्रमाणेच निर्मल, निखळ , सगळ्यांच होत तस हीच सुधा योग्य वयात लग्न झाल. आई वडील चांगला जावाई मिळाला म्हणून खुश होते .  सुखी संसारची स्वप्न सरिता आणि सारंग ने पाहायला सुरुवात केली. सुरूवातीच वर्ष सणवार ह्यात संपल , नंतर ती दोघ खूप छान रमली संसारात . त्यांना एक सुन्दर , गोंडस मुलगी झाली , आणि तिच्यामुळे त्याचं घरच भरल , खूप छान चालल होत
पण नियतीला हे मान्य नव्हत , आणि एक दिवस सारंग घरी येताना त्याच्या गाडीचा अपघात झाला आणि काळाने घात केला ,सारंग जागीच गेला , सरिता साठी हे दुःख म्हणजे इतका मोठा धक्का होता कि ती मान्यच करायला तयार नव्हती कि सारंग नाही , पण मुली कडे बघून ती सावरली , आता आपल्यालाच मुली कडे बघायचं , तिच्या भविष्याबद्दल आपण  आणि सारंग ने जे स्वप्न बघितल होत आता ते आपणच पूर्ण करायचं खूप शिकवायचं होत सारंग ला तिला. तिला मोठ करायचं हे एकच उद्दिष्ट आता सरिता च होत . जेम तें ४ मध्ये होती अवनी सारंग वारला तेव्हा आणि तेव्हापासूनच सरिता तिच्या साठी तिचे बाबा आणि आई.

माधवी ,,, बोलायला अतिशय मधाळ, गोड मुलगी. तिने तीच BSC computer मध्ये प्रथम श्रेणीत पूर्ण केला आणि MSC computer ला Admission घेतली . माधवीच्या आई वडिलांना तिचा खूप अभिमान होता . वडिलांची तर ती खूप लाडकी होती , त्यांना माधवी हि एकच आपत्य .हिलाच खूप शिकवायचं मोठ करायचं , तिच्या पायावर उभ करायचं हे येवढ त्या दोघांच स्वप्न . पहिल वर्ष खूप छान गेल पण दुसया वर्षी हार्ट attack ने तिचे वडील वारले .आई housewife. नातलगानी आता हि जवाबदारी आपल्यावर येईल म्हणून येण कमी केल , माधवीला जॉब शोधण  अपरिहार्य होत , पण नशिबाची साथ तिला एका चांगल्या private कंपनी मध्ये नौकरी मिळाली शिवाय बाहेरून तिने पुढच्या शिक्षणा साठी फॉर्म भरला, तिने स्वतःला आणि आई ला ह्या धक्क्यातून सावरल. आणि खंबीरपणे जवाबदारी उचलली. आज तिने MSC computer पूर्ण केलय, आणि एका मोठ्या MNC मध्ये ती नौकरी करतीय .

मेघना लाघवी मुलगी ,नाईक कुटुंबात दोन मुलांन नंतर झालेली. एकुलती एक म्हणून खूप लाडात वाढलेली . तीच BA झाल आणि एक लांबच पण चांगल स्थळ आल. जवळच्याच एका ने सुचवलेल. भावांनी आणि वडिलांनी जाऊन शेजारी पाजारी चौकशी केली मुलगा माधव चांगला आहे म्हणून कळाल . भरपूर हुंडा देऊन आणि धूम धडाक्यात, सालंकृत लग्न लाऊन दिल . लग्ना नंतरचे सणावाराचे दिवस संपले आणि हळू हळू त्या मुलाचे आणि त्याच्या घरच्यांचे एक एक नखरे सुरु झाले .
माहेरी साधी भाजी चीराची सवय नसलेली मेघना रोज लवकर उठून सर्व झाड झुड आवरून , सकाळचा नाश्ता , दुपारच जेवण , भांडी धुण, करू लागली , तिची नणंद गावातच राहत होती , ती सुधा रोज घरी येऊन राहू लागली , तिच्या बरोबर तिचा नवरा, दोन मुल पण असत , मेघना हे सुधा हसत करत होती पण त्या नंतर तिच्या सासरच्या कडून पैस्याची मागणी होऊ लागली , घरात वाशिंग मशीन घ्यायचं माहेरून पैसे आण , भाज्या खराब होतात , घरातल फ्रीज खराब झालय नवीन घ्यायच , देतील का तुझे भाऊ आणि वडील पैसे , अश्या प्रकारे तिचा छळ सुरु झाला .
मेघना आणि माधव कधी एकत्र आलेच नाही , त्यांची मन कधी जुळलीच नाही . खरी परिस्थिती वेगळीच होती , माधवला दारूच व्यसन होत हे लग्ना नंतर थोड्याच दिवसात मेघनाला  कळाल . पण ते तिने माहेरी नाही कळवलं , जेव्हा मेघनाचे  भाऊ आणि वडील लग्ना आधी  चौकशी साठी येणार होते तेव्हा आधीच माधवच्या आईने शेजारी सांगून ठेवल होत . काही दिवसात मेघनाला हे हि कळाल कि माधवच्या व्यसनाने आता त्याच शरीर पूर्ण खंगून टाकल आहे , एक दिवस त्याला दवाखान्यात admit कराव लागल आणि त्या नंतर तो घरी आलाच नाही .
जेम तें दीड वर्षाचा संसार त्या दोघांचा . नंतर मात्र मेघना च्या दोन्ही भावांनी तिला घरी आणल आणि परत त्या घरात कधी तिला नाही पाठवलं , तिच्या सासूने खूप फोन केले पण खरी परिस्थिती कळल्यामुळे त्यांनी तिला कधीच परत पाठवल नाही .त्यांनी तिला B.Ed केल आणि एका शाळेत आज मेघना शिक्षिका म्हणून आहे .

नयना अतिशय सुंदर , ती १२ वी शिकत असतानाच तिची आई वारली . वडिलान साठी हा धक्का सहन करण्या सारखा नव्हता , त्यांना त्यात एक हार्ट attack येऊन गेला . कस तरी ते तिच्या साठी जॉब करत . त्यांनी नयनाला शिकवलं MCA केल. चागल्या कंपनी मध्ये तीला नौकरी मिळाली .
वडिलांनी तीच लग्न एका चागल्या घरात लाऊन दिल मुलगा समीर सुद्धा एक software developer चांगल्या कंपनी मध्ये नौकरीला . त्याच्या घरात आई वडील , मोठा भाऊ वाहिनी .  कसलीच कमी नव्हती , पण नयना आणि समीर च्या लग्ना नंतर समीर च्या मोठ्या भावाने इस्टेटी साठी  भांडण सुरु केल आणि घरात वाटणी मागू लागला येवढे दिवस प्रेमाने मोठ केलेलं घर आता वाटल जाईल , दोन तुकडे होतील , एकत्र कुटुंबच स्वप्न बघितलेले समीर चे आई वडील ह्या वागण्या मुळे धास्तावले , शेवटी भांडण खूप टोकाला गेल, वाहिनी वाटणी होत नाही म्हणून माहेरी निघून गेल्या आपल्या मुळे आपल्या मुलाचा संसार मोडू नये म्हणून त्यांच्या घराची वाटणी झाली, सर्व गोष्टी सम समान वाटल्या गेल्या , मोठ्या भावाने आई वडिलांची जवाबदारी समीर वर टाकली  आणि स्वतःच्यावाटेच सर्व विकून तो  गाव सोडून निघून गेला , आई बाबांसाठी हा खूप मोठ्ठा धक्का होता , पण  नयना ने त्यांना सावरल , सांभाळून घेतल . मला तुमची मुलगीच समजा म्हणून तिने त्यांना दोघांना आधार दिला, आज ती आई वडिलान प्रमाणे त्यांची काळजी घेते. मधून मधून तिचे वडील पण त्यांच्या कडे येतात . नयना आणि समीर ला दोन जुळी मुल आहे ते आजी आजोबा बरोबर खूप छान राहतात .
  

रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

Humalien


हि गोष्ट सुरु होते  जुलै १९६९ , नासा ने पाठवलेल्या Apollo ११ ह्या spaceflight च sucessfull landing नंतर ह्या space शिप मध्ये नील आर्मस्ट्रांग आणि ऐडविन "बज़" ऐल्ड्रिन. हे पहिले असे मानव आहेत जे चंद्रावर जाऊन आलेले. परत येताना त्यांनी तिथली माती आणि काही खडकांचे नमुने आणले . अस म्हणतात कि नील ने तिथे काही वस्तू ठेवल्या एक सोनेरी पान आणि एक recored संदेश ज्यात मानवच्या अस्तित्वा बद्दल माहिती होती . आणि ते तिथून निघाले .
पृथ्वीय वेळेच्या नुसार ऑगस्ट १९६९ चंद्रावर पहिलेच असलेल्या अलिएन spece center ला ते पान आणि तो संदेश मिळाला . त्यांच्याच एका निरीक्षण करणाऱ्या विमानाला ते सापडलं , मानवाचं चंद्रावर येण आणि काही नमुने घेऊन जाण  हे त्यांना आधीच माहित होत , even त्यांच्या एका यंत्राने त्याचं हे सर्व mission  कॅमेरा मध्ये रेकॉडे पण केल होत . ते कसे उतरले, किती लोक चंद्रावर उतरले , कोण चंद्राच्या orbit मध्ये घिरट्या घालतं होत  , परत कसे गेले, उतरल्यावर काय केल , काय बोलले , काय सोडून गेले , त्यांचा उद्देश काय होता , हे सर्व त्यांनी रेकॉर्ड केल .
ह्या massage मिळाल्यावर लगेचच चंद्रावर एक मीटिंग बोलावण्यात आली , Mars वरून महत्वाचे  VIP लोक चंद्रावर बोलावण्यात आले . कारण त्यांच्या दृष्टीने चंद्र हीच सध्यासाठी सगळ्यत सुरक्षित अशी जागा होती.  खूप विचार मंथना नंतर ठरवण्यात आले कि पृथ्वी वरची मानव हि आपल्या दृष्टीने योग्य पर्याय आहे , मानव जात चंद्रा वर पाउल ठेऊन जाते म्हणजे त्यांनी बौद्धिक दृष्ट्या आपल्या basic level ला पार केल आहे. ते आपल्याला ह्या संकटातून वाचवतील, मदत करतील ,आणि ते आपल्या बाबतीत खूप उस्तुक हि आहेत , हे आपण केल्यालेल्या त्यांच्या अभ्यासावरून लक्षात येते तर आपण स्वतः हून त्यांच्याशी संपर्क साधायचा आणि त्यांच्याशी बोलन करून करार करायचा. आता ह्या शिवाय आपल्या कडे पर्याय नाही. आपल्या ग्रहीय जातीच अस्तित्व टिकवायच असेल तर आता पृथ्वी ची मदत आपल्याला घ्यावीच लागेल , आता लांबून त्याचं निरक्षण करण बंद करून direct संवाद साधायला हवा अस ह्या मीटिंग मध्ये ठरवण्यात आल .
इकडे पृथ्वीवर आणलेल्या नमुन्याची चाचणी सुरु झाली होती , आपल mission sucessful झाल ह्याची party सुरु होती . नील आणि ऐल्ड्रीन च्या मुलाखती सुरु होत्या . आणि अशाच एका संध्याकाळी नासा center ला एक संदेश चंद्र्वरून पाठवण्यात आला ,त्यात फक्त “हेल्प ...need you ...” असाच होत , आणि विशेष म्हणजे हा massage इंग्लिश मध्ये होता .
नासा ने त्या massage ला reply पाठवला , “we are ready to help”,  हा massage मिळताच चंद्रावर सगळ्यांना आनंद झाला , एक आशेचा किरण दिसल्या सारख त्यांना जाणवल , आपण जगू हि एक आशा निर्माण झाली आणि लगेचच पुढची भेटण्याची तयारी दाखून आम्हीच तुम्हाला भेटतो म्हणून कळवण्यात आल .
पृथ्वी वरचे तर उस्तुक होतेच , अलिएन शिप पृथ्वीवर वाळवंटात land झाल आणि तिथेच मीटिंग ठरली .
त्यांनी Mars वरची सध्याची त्यांची परिस्थिती सांगितली , आम्हीच निर्माण केलेले जैविकअस्त्र आम्हालाच घातक ठरले . आमच्या  इथे खूप मोठ्ठ युद्ध सुरु आहे , त्यात जैविक हत्यार ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर सुरु आहे , कुणीच कोणच ऐकायच्या परिस्थिती नाही , ह्या युद्धा चा परिणाम म्हणजे आमची नवी पिढी हि अपंग , आजारी होत आहे , आमच आयुष्यमान पण कमी झालय , सगळी कडे आजार वाढतच आहेत .तुम्ही जे आमची काही फोटो पाहिलेत ते सगळे ह्या जैविक अस्त्राचे शिकार आहेत , आम्ही दिसायला अगदी तुमच्या सारखेच आहोत पण ह्या अस्त्राचा परिणाम ... हे आम्ही आमच्या लोकांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती लोक ऐकण्या बाहेर गेलीत .Mars ग्रह सोडून दुसरी कडे जाण  हा एकच पर्याय आमच्या पुढे आहे म्हणून आम्ही राहण्याची वेगळी जागा आणि आमची नवी सुदृढ पिठी निर्माण करण्यासाठी पृथ्वीच्या चंद्राची निवड केली पण ह्यात आम्हाला तुमची मदत व्हावी अशी अपेक्षा ठेऊन तुमच्याशी स्वतः संपर्क साधला.
पृथ्वीय लोकांनी त्याचं म्हणन ऐकल , आणि मदत करण्याची तयरी पण दाखवली , शिवाय तुम्ही पृथ्वीवर या म्हणून पण सुचवलं , पण त्यांच्या म्हणण्या नुसार पृथ्वी वर राहाण हे त्यांना जमणार नव्हत , तुम्ही पृथ्वीवासी खूप लवकर दुसर्या वातावरणात सामाऊन जातात , खूप लवकर परिस्थिती नुसार बदल घडून आणतात , पण आम्ह्च्या लोकांना ते शक्य नाही आम्ही एकदा तुम्हाला न सांगता काही आमची लोक तुमच्या इथे प्रस्थापित करून पहिली पण ती रुळू नाही शकली ,थोड्याच वेळात त्यांना आम्हाला परत बोलावाव लागल , त्या साठी आम्हाला एक वेगळा ग्रहच शोधावा लागेल आणि तो म्हणजे चंद्र .
पण मग तुम्ही पृथ्वी वासियांन कडून कोणती मदत मागता हे नाही कळाल आम्हाला ?
“आम्हाला एक करार करायचा आहे तुमच्याशी “.  “करार ? कोणता करार?” “सांगतो आम्ही Mars वासी बुद्धीने जरी तुमच्या पेक्षा चौपट असलोत तरी सध्या आम्ही शारीरिक दृश्य कमकुवत झालो आहोत आम्हाला तुमच्या लोकांच्या मदतीने आमची पुढची पिढी भक्कम आणि सुदृढ करायची आहे , त्या साठी तुमच्या ग्रहावरचे लोक आमच्या ग्रहावरच्या लोकां बरोबर राहून त्यांचा संक्रमणातून एक नवी पिढी तयार करतील तरच ते शक्य आहे. त्यांना आमच्या आजाराचा कुठलाही त्रास होणार नाही ह्याची दक्षता आम्ही घेऊ आणि तुम्ही आम्हाला ती सुदृढ पिढी द्यावी “
तस बघितल तर खूप सोप्पा उपाय होता हा पण ह्यात हि एक अट होती  Mars वरील स्री किवा पुरुष हे आनंदाने जर मनुष्य स्त्री किवा पुरुषाला स्वीकारतील तर च नवनिर्मिती होईल नाही तर नाही , ह्या साठी त्यांनि एकमेकांना  आकर्षित करण, एक विश्वास निर्माण कारण गरजेच , आणि त्या साठी एकत्र राहण गरजेच आहे .
ह्यावर खूप विचार केल्यावर एक निष्कर्ष काढण्यात आला कि Mars काही सुदृढ उरलेले लोक, काही दिवसांसाठी पृथ्वीवर पाठवतील , त्यांना ह्या करार बद्दल काही सांगण्यात येणार नाही आणि तसच पृथ्वी वासियांनी पण गोपनीयता ठेवावी , त्यांच्यातून ज्यांची मन जुळतील त्यांना पुढे चंद्रावर राहण्या योग्य वातावरण करून शिफ्ट करण्यात येईल . आणि तेव्हाच सत्य सांगण्यात येईल .”
ह्या बदल्यात Mars पृथ्वी वासियांना बौद्धिक क्षमता कशी वाढवता येईल ह्याचे तंत्र देइल शिवाय नवीन तयार होणारा ग्रह म्हणजे त्यांची नवी पिढी हि पृथ्वी शी मैत्रीचे संबंध ठेवेल आणि मदत देखील करेल आणि नवीन शोधात सुद्धा Mars सर्व प्रकारे पृथ्वी ला मदत करत राहील. शिवाय Mars वरील वातावरण परत पूर्ववत झाल कि पृथ्वी वासी हव तेव्हा येऊ जाऊ शकतील .त्यासाठी सर्व योग्य ती दळणवळण हे Mars बघेल .
सर्व अटी मान्य होतात , आणि mars वरून काही लोक पृथ्वी वर येतात त्यात निओ पण असते . निओ अतिशय सुंदर आणि धाडसी मुलगी . सुंदर म्हणजे पृथ्वीच्या भाषेत एकदम अप्सराच , अलीएन असे पण असतात हा  तिला बघितल्यावर पडणारा प्रश्न , सावळी  तुकतुकीत कांती , लांब भूरे केस , नाजूक जिवणी , कामनीय बांधा , पाणेदार टप्पोरे तपकिरी डोळे, सुमधुर आवाज , लांबसडक नाजूक बोट , आणि कमालीची धाडसी वृत्ती , पृथ्वीच्या एखाद्या लावण्यवती सारखीच होती निओ , बघितल्यावर कोणीही तिच्या प्रेमातच पडेल आणि लक्षात पण येणार नाही कि हि परग्रहीय आहे . ह्या आधी सुद्धा  एका research साठी Mars ने तिला पृथ्वीवर पाठवले होते ,पण तो कालावधी खूप कमी होता , आता हि एका research साठी आणि Observation साठी आपण येथे पाठवण्यात आलेलो आहोत असच तीला सांगण्यात आल होत. आधीच्या visit मध्ये ती समीर ला भेटली होती , आणि तेव्हाच तो तिला आणि ती समीर ला खूप आवडली होती . पण कमी कालावधी असल्यामुळे ती कधी त्याच्याशी बोलली नाही .
ह्या वेळेला तिला Task अजून appoint  झाल नव्हत . म्हणून तिने समीर चा शोध घ्यायला सुरुवात केली .मागच्या वेळेस ते जेथे भेटले होते तिथे ती पोहोचली . तिने खूप शोधलं पण समीर काही भेटला नाही . हताश होऊन परतांना वाटेवर तिला समीर दिसला , आणि न कळत तिने त्याला हाकच मारली , समीर सुद्धा तिला बघून खुश झाला , पण हि इथे कशी , आपण तर फक्त नजरानजर भेटलेलो , मग हिला माझ नाव कस माहित  , हा विचार करत असता निओ त्याच्या समोर उभी राहिली , “hello समीर मी निओ , ओळखलस का आपण भेटलेलो मागच्या वर्षी, ”हो मी ओळखल, पण तुंला माझ नाव कस माहित आणि आपण बोललो पण नव्हतो ‘’ “अरे हो , माझा प्रोजेक्ट खूप कमी दिवसाचा होता तुझ्या कंपनी मध्ये , आपण बोललो नाही पण माझ्या एका सहकाऱ्याने तुझ नाव मला सांगितल , तू मला तेव्हा development  ला मदत केली त्या बद्दल मला तुला thank you म्हणायचं होत पण माझ काम झाल आणि मला परतावं लागल आणि आपण भेटूच शकलो नाही ” “हो ,,, मला पण तुंला काही सांगायचं होत पण राहून गेल .... ” , “ह्यावेळेला मी खूप दिवसासाठी आलेली so भेटूयात आपण”.  “हो,  नक्की ” “तू कुठे राहतोस , सध्या माझी राहण्याची काही सोय होऊ शकेल का रे कारण ह्या वेळेला माझ्या parent शिप ने काही सोय नाही केली ” ‘काय parentship ? ‘’, “हो ... म्हणजे office ने ” , “ok , काही प्रोब्लेम नाही , माझ्या घरा शेजारी एक flat आहे तो आपण विचारू , तुला सोबत पण होईल ” “ok , चल ” , समीर निओ ची सोय करून देतो , ह्यावेळेला तिला फक्त Observation करायचं काम होत आणि report दिवसाच्या शेवटी Mothership ला सेंड करायचे . हे काम खूप सोप्प होत , म्हणून मग निओ रोज वेग वेगळ्या area स्कॅन करत होती , कोणाला संशय येऊ नये म्हणून तिने एक DSLR कॅमेरा सोबत घेतला होता आणि ती फोटो पण घेत होती कि जेणे करून एक Traveler  वाटेल . संध्याकाळी परतत असताना ती समीर बरोबर येत असे , ह्या मुळे दोघात खूप कमी दिवसात खूप मस्त मैत्री झाली होती . आणि समीर ला तर ती पहिल्या भेटीतच आवडली होती .
एक दिवस समीर च्या office मध्ये break मध्ये गप्पा सुरु होत्या , त्याच्या एका सहकाऱ्याचा  ज्योतिष विषयी अभ्यास चांगलाच दांडगा होता  , त्या दिवशी त्याने गम्मत म्हणून  समीर चा हात बघितला आणि ते बघून तो थोडा हादरलाच , “समीर तू एका विशिष्ट कामा साठी ह्या जगात आहेस , तुझ्या आयुष्यात खूप मोठी उलथापालथ होणार आहे , ती नक्कीच चांगलीच आहे पण तुला ती , तुला काय आख्या जगासाठी ते नवीन असणार आहे , आणि लवकर ते तुझ्या आयुष्यात घडेल , एक नवीन व्यक्ती तुझ्या आयुष्यात येईल आणि तुझ जगच बदलून जाईल ” एवढच सांगून तो निघून गेला . समीर विचार करत होता , नवीन व्यक्ती कदाचित ती निओ असेल , ती आहे च मुळी  वेगळ्या देशाची , म्हणून हा अस बोलला , पण जे काही होणार ते चांगलच न मग काही प्रश्नच नाही .
आज तो निओ ला prapose करणार होता , तस त्याने ठरवलच होत . दुपारीच त्याने तिला फोन केला आणि नेहमी भेटतो  तिथे संध्याकाळी ये म्हणून सांगितल , संध्यकाळ कधी होते ह्याचीच तो वाट बघत होता , ती हो म्हणेल का , कि नाही म्हणेल ह्याच विचार तो होता , दुपार काही लवकर सरत नव्हती त्याची , तो सतत घड्याळात बघत होता , उस्तुकता, आनंद आणि भीती अस सगळच एकदम त्याला जाणवत होत , शेवटी office सुटल आणि तो निघाला , निओ आधीच तिथे पोहोचली होती , मारून रंगाच्या चुडीवर ड्रेस मध्ये ती जास्तच सुंदर दिसत होती , समीर ने एक rose bouquet तिच्या साठी घेतला होता , गेल्या गेल्या लागलीच कुठलाही आडपडदा न ठेवता कुठली हि लाज न बाळगता , कुठली हि भीती आपल्यावर हावी होण्याच्या आत समीर गुडघ्यावर बसला आणि त्याने तिला माझ्याशी लग्न करशील म्हणून विचारल , निओ ला हे अपेक्षित होतच पण इतक्या sudden नव्हत , तिने लगेच त्याला हो म्हंटल . त्या दिवशी जाम खुश होते दोघे , समीर एक अनाथ मुलगा , त्याच्या एका लांबच्या नातेवाईक त्याला सांभाळ होते , त्याचे आई वडील एका अपघातात गेले आणि त्या नंतर तो त्या त्याच्या नातेवाईक कडेच मोठा झाला त्यांना हि मुलबाळ नसल्याने स्वतः च्या मुला प्रमाणे त्याला वाढवल होत , काकाचं हि वय झाल होत आणि काकू जाऊन एक वर्ष झाल होत .
हि सगळी गोष्ट त्याने निओ ला सांगितली , काकाच माझे सर्वेसर्वा आहेत . पण सध्या खूप आजारी असतात .  म्हणून आपण उद्याच लग्न करूयात , निओ काही बोलण्याच्या आतच समीर तयारी साठी निघून गेला , उद्या सकाळी आपण भेटू मी येतो तुला घ्यायला तयार रहाअस म्हणून तो तयारीला लागला . निओ रात्रभर विचार करत होती , तेव्हा तिला तिच्या mothtership मधून Congratulation  असा massage आला . ह्यांना कस कळल ,आणि Congratulation ? हे सगळ काय आहे ? तेव्हा mothtership मधून तिचे वडील तिला भेटायला आले आणि त्यांनी तिला सांगितल कि तुंला एक योग्य आणि सुदृढ जोडीदार मिळावा म्हणूनच तुला पृथ्वी वर आम्ही पाठवल होत , समीर खूप चांगला आणि हुशार मुलगा आहे , तुझी निवड नक्कीच बरोबर आहे . ह्या पुढे आम्ही तुम्हा दोघानसाठी चंद्रावर एका सुंदर ठिकाणी तुमची राहायची सोय केली आहे , आम्ही त्याच्या काकांना पण हे सगळ सांगितल आहे .
लग्न होताच तुम्ही तिकडे शिफ्ट व्हाल आणि सुखी संसार करा . येवढ बोलून तिचे वडील परत अदृश्य झाले . दुसर्या दिवशी समीर तिला घ्यायला आला , लग्नाच्या ठिकाणी लग्नाच्या अगोदर निओ चे वडील आणि अजून काही लोक निओ आणि समीर ला भेटायला आले . समीर ला लग्ना अगोदर सर्व कळाव अशी निओ ची इच्छा होती , म्हणून निओ चे वडील तीथे आले त्यांनि  जे निओ ला सांगितला ते सर्व समीर ला सांगितल , हे समीर साठी खूप नवीन आणि आश्चर्यकारक होत . निओ एक अलीएन आहे , हे सुद्धा , निओ ने अगोदर खूप वेळा त्याला सांगण्याचा प्रयन्त केला पण समीर ऐकण्याचा परीस्थित नव्हता .काकांना हि हे सर्व माहित आहे हे कळल्यावर तर समीर अजून आशर्यचकित झाला .
निओ चे बाबा त्याला बोलले कि आम्ही सुद्धा तुमच्या सारखेच आहोत फक्त बुद्ध्यांक  आणि खाण्या पिण्याच्या सवयी वेगळ्या , बाकी तू निओ ला ओळखतोस . आता तूच ठराव काय निर्णय घ्यायचा. समीर विचार करतो त्याला त्याच्या त्या मित्राच बोलण  आठवत आणि  हे हि आठवत कि तो एका विशिष्ट कामा साठी येथे आलाय कदाचित ते काम म्हणजे हेच असेल . बराच वेळ विचार केल्या नंतर समीर एक निर्णय घेतो आणि सगळ्यांना सांगतो , मी निओ वर खरच खूप मनापासून प्रेम केल , मला ती पहिल्या भेटीतच खूप आवडली , मला तिच्यात वेळ अस काही जाणवलच नाही . आणि आता जेव्हा कळतय कि ती एक परग्रहीय आहे तर मी तिला सोडून देऊ , कस शक्य आहे ,त्याच हे बोलन ऐकताच निओ त्याला मिठीच मारते . ती दोघ लग्न करतात . काही दिवस पृथ्वीवरच राहून मग त्यांना चंद्रावर एका सुंदर वस्तुत शिफ्ट केल जात , ते तिथे पोहोचण्या आगोदरच तिथे अजून ४-५ संसार आधीच सुरु झालेले असतात ,